Skip to main content

Posts

आपत्तीच्या काळात लोकप्रतिनिधींची जबाबदारी | Disaster Management

१. आपत्तीच्या वेळी लोकप्रतिनिधींने शासकीय यंत्रणा व लोकांशी सकारात्मक समन्वय साधावा / ठेवावा. २. बाधित लोकांना व त्यांचे नातेवाईकांना धीर द्यावा. त्यांचे सांत्वन करावे. ३. स्थानिक संसाधनाचा वापर करून आपत्तीची तीव्रता कमी करावी. मान्सून पूर्व करावयाची तयारी १. ग्रामपंचायतीने गटारे / नाली स्वच्छ करून ठेवणे. २. नदीच्या काठावरील अतिक्रमणे / अडथळे काढणे. ३. स्वस्त धान्य दुकानदार यांना शासनामार्फत पुरविण्यात येणारे धान्य व केरोसीनचा पर्याप्त साठा उपलब्ध करून देणे. ४. गावातील ग्रामपंचायतीमध्ये जनतेची सभा घेऊन मुले, महिला व पुरुष यांना पूर प्रतिबंधक परस्थितीशी सामना करण्याबाबत माहिती देणे. ५. प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक औषधी साठा उपलब्ध करून ठेवणे. ६. सर्व गावांना टीसीएल उपलब्ध करून देणे. ७. ग्रामसेवक, तलाठी, कृषि अधिकारी यांनी गावातील पूल, रस्ते, बांध, बंधारे कमकुवत किंवा नादुरुस्त असल्यास त्याची माहिती संबधित विभागास देणे. ८. पूर परस्थिती उदभवल्यास जनतेला सुक्षित स्थळी हलविणेसाठी आवश्यक ती उपाययोजना करणे. उदा. शाळा, शासकीय इमारत सुस्थितीत करून ठेवणे. ९. आ...

आपत्तीच्या काळात स्वंयसेवी संस्था आणि मित्र मंडळाची जबाबदारी | Disaster Management

१. आपत्तीच्या काळात स्वंयसेवी संस्था आणि मित्र मंडळेही महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात. २. त्यांच्या मदतीने आपणांस मदत आणि सोडवणूक, प्रथमोपचार, माहितीचे वितरण, मृत व्यक्ती आणि जनावराची विल्हेवाट लावणे,    मदतीचे वितरण इत्यादी कार्य करता येतात. ३. आपत्तीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास दर दोन तासांनी घटनाविषयी अद्यावत माहिती देणे.

आपत्तीच्या काळात अग्निशमन विभागाची जबाबदारी | Disaster Management

अग्निशमन दल अधिकारी यांच्या जबाबदा-या आपत्तीपूर्वी व आपत्तीच्या वेळी अग्निशमन दल अधिकारी यांनी खालील जबाबदा-या पार पाडणे आवश्यक आहे. १. बाधित क्षेत्रामध्ये अडकलेल्या लोकांची सुटका करणे. २. जखमी व्यक्तींना रुग्णालयामध्ये स्थलांतरीत करण्यास प्राधान्य देणे. ३. बाधित क्षेत्रामधून सर्व व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे. ४. बाधित क्षेत्रामधील लोकांची विद्युत उपकरणे आणि विद्युत पुरवठा यापासून सुरक्षा करणे. ५. रस्त्यावर पडलेल्या झाडांमुळे निर्माण झालेला अडथळा दूर करून वाहतूक सुरळीत ठेवणे. ६. तालुका प्रशासनाशी समन्वय साधून, पडझड झालेल्या घरांमधून लोकांची सुटका करणे. ७. बाधित क्षेत्रामध्ये घडणा-या घटना, तसेच नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचा-याविषयी अग्निशमन नियंत्रण कक्षास माहिती देणे व अतिरिक्त माहिती बाबत कळवणे.

आपत्तीच्या काळात जिल्हा माहिती कार्यालयाची जबाबदारी | Disaster Management

आपत्तीच्या काळात जिल्हा माहिती कार्यालयाची जबाबदारी १. जिल्ह्यातील विविध खात्यांची माहिती प्रसार माध्यमास देणे. २. प्रसार माध्यमांशी समन्वय साधणे.

आपत्तीच्या काळात कृषि विभागाची जबाबदारी | Disaster Management

१. शेतीच्या नुकसानीचे मोजमाप / सर्व्हेक्षण करण्यासाठी तहसिलदारांच्या साहाय्याने पथक तयार करणे. २. शेतीच्या नुकसानग्रस्त लाभधारकांची सर्व्हेक्षणानुसार यादी तयार करणे. २. शेतीच्या नुकसानीचे मोजमाप करणे. ३. शेतीच्या नुकसानीचे भरपाई वाटप करण्यास जिल्हा व तालुका प्रशासनास मदत करणे.

आपत्तीच्या काळात रेल्वे विभाग व एस. टी. महामंडळाची जबाबदारी | Disaster Management

रेल्वे विभाग आपत्तीच्या काळात १. रेल्वे स्टेशन वरील गर्दीचे नियंत्रित रेल्वे पोलिसांमार्फत करणे. २. लोकांना रेल्वे वेळापत्रका, रेल्वे अपघताविषयी अद्यावत माहिती देणे. ३. लोकांना/ जखमींना प्राधान्याने दवाखान्यात/ इस्पितळात हलविणे. ४. आपत्तीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यलयाच्या नियंत्रण कक्षास दर दोन तासांनी घटनेविषयी  अदयावत माहिती देणे. ५. आपत्तीच्या काळात स्वयंसेवी संस्था आणि मित्र मंडळेही महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात. त्यांच्या मदतीने मदत आणि सोडवणूक प्रथमोपचार, माहितीचे वितरण इत्यादी कार्य करणे. एस. टी. महामंडळ व प्रादेशिक परिवहन १. बाधित लोकांना स्थलांतरीत करण्यासाठी एस. टी. बसेस उपलब्ध जिल्हा प्रशासनास उपलब्ध करून देणे. २. आपत्ती काळात जिल्हा प्रशासनास जड संसाधन उपलब्ध करून देणे. उदा. जेसीबी/ क्रेन/ पोकलम डंपर / बस इत्यादी.

आपत्तीच्या काळात दूरसंचार निगम (टेलिफोन सेवा) यांची जबाबदारी | Disaster Management

१. दूरसंचार सेवा पूर्ववत करणे. २. दूरसंचार सेवा पूर्ववत करण्यासाठी विशिष्ठ गट तयार करणे. ३. अधिक मदतीसाठी तहसिलदारांमार्फत जिल्हा नियंत्रण कक्षासी संपर्क साधावा. ४. आपत्तीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास दर दोन तासांनी घटनेविषयी अद्यावत माहिती देईल.