संस्कृती विना जल आणि जलविना संस्कृती ही बाब अशक्य आहे. पाणी आणि समाज, नदी आणि समाज, सरोवर सागर, भूजल, पर्जन्य यांचे भिन्न पातळीवर पडलेले नाते, कृषि आणि पाणी यांचे नाते अतूट आहे. पाणी नैसर्गिक देण आहे, निसर्गामध्ये मानवाच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता आहे. देशाचे व राज्याचे अर्थकारण अजूनही पावसाळी शेतीवर अवलंबून आहे. पावसाने दगा दिला तर विकासाची घोडदौड रोखली जाते. पाण्याचा स्त्रोत फक्त पाऊस आहे. निसर्ग. पाऊस, पाणी, हवा यांचा उपभोग घेण्याचे ज्ञान जलशास्त्राच्या दृष्टीकोनातून अवगत झाल्यावरच दुष्काळाची व टंचाईची जाणीव कमी होवू शकते. आपल्याकडे टंचाई अनेक प्रकारे जाणवू शकते. पाणी टंचाई, चारा टंचाई, अन्न टंचाई, शेतीत मजुरांची टंचाई या सर्व टंचाई विचाराच्या टंचाईतून बोकाळतात. यावर मात करण्यासाठी जलसाक्षरता, जलसंवर्धन, पाणी वापर साठवणूकीचे प्रबोधन, ललित वाङमयाच्या माध्यमातून हसत खेळत रंजकपणे, कथा, कविता, लेख, पत्रकारिता व त्यांची परिणामकता निश्चितच वाढवता येईल या विचारातून सर्व जलतज्ज्ञांनी महाराष्ट्र सिंचन सहयोग या व्यासपीठावरून महाराष्ट्रभर जनहितोपयोगी विचारांची व प्रबोधनाच...