Skip to main content

आपत्तीच्या काळात महसूल खात्याची जबाबदारी | Disaster Management | Apatti Vyavasthapan

महसूल विभाग अधिकारी

१. जिल्हाधिकारी
२. अप्पर जिल्हाधिकारी
३. निवासी उपजिल्हाधिकारी
४. उपविभागीय जिल्हाधिकारी
५. तहसीलदार
६. मंडळ अधिकारी
७. तलाठी

महसूल विभाग जबाबदा-या


आपत्तीपूर्व नियोजन

१. आपआपल्या विभागावर आपत्ती व्यवस्थापन समित्यांची बैठक घेऊन आपत्ती निवारणासाठी नियोजन करणे.
२. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा / तालुका आपत्ती व्यवस्थापन आराखडा / गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे. या आरखडयाचे दोनदा अद्यावतीकरण करणे.
३. आपल्या विभागातील संपर्क यंत्रणा सज्ज ठेवणे. असेच आपली संपर्क यंत्रणा बिघडल्यास त्यास पर्यायी यंत्रणा तयार ठेवणे.
४. आपआपल्या क्षेत्रात आपत्तीच्या काळात लोकांना हलवण्यासाठी सुरक्षित निवा-यांची व्यवस्था करून ठेवावी.
५. नियंत्रण कक्षाची तपशीलवार व्यवस्था करावी. नियंत्रण कक्ष २४ × ७ मध्ये सुरु ठेवावे.मदत आणि सोडवणूक कार्यासाठी आवश्यक कार्यासाठी आवश्यक असणारे साहित्य जमा करून ठेवावे. उदा. मेणबत्ती,बॅटरी, लाईफ जाकेट, गाडीचे टयूब, पेट्रोमॅक्स, दोर, सर्च लाईट, विविध करवती, मेगाफोन, पोहणा-या व्यक्तीची यादी (फोन नं सहीत) इत्यादी.
६. आपत्तीच्या काळात लागणा-या जडसंसाधनाची उपलब्धता आपल्या परिसरात कोठे आहे याची यादी करून ठेवावी. उदा. जे.सी.बी, पोकलन, ट्रक, बोटी, जनरेटर इत्यादी.
७. जिल्हा/ तालुका/ गावांचे नकाशे नियंत्रक कक्षेत ठेवावेत. (तसेच संपर्क यंत्रणा अद्यावत ठेवावी.)
८. स्वयंसेवी संस्था आणि त्याचे सदस्य यांचे पत्ते आणि दूरध्वनी क्रमांक दर्शनीय भागात लावावेत.
९. आपल्या विभागातील माहिती www.idrn.gov.in या वेबसाईटवर अद्यावत करण्यासाठी उपलब्ध करून दिले जाईल.
१०. आपल्या विभागातील प्रशिक्षित गटाच्या नियमित संपर्कात राहून रंगीत तालीमचे ( Mock Drills ) आयोजन करणे.

आपत्तीची सूचना मिळताच करावयाची कार्यवाही

१. आपत्तीची सूचना मिळताच तालुका, गाव पातळीवरील अधिकारी यांना त्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याच्या सूचना देणे.
२. विविध विभागाच्या अधिका-यांच्या तयार केलेल्या गटांनी नियोजनानुसार कार्य करण्यास सुरुवात कारणे. उदा. मदत व सोडवणूक गट, प्रथमोपचार गट इत्यादी.
३. सदर बाबीची खात्री करून आपत्ती विषयक माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास व वरिष्ठ अधिका-यांना देणे.

आपत्तीच्या काळात

१. आपत्तीच्या काळात महसूल खाते अग्निशमन खात्याच्या मदतीने सोडवणुकीचे कार्य करेल.
२. जखमींना उपचारासाठी हलविण्यासाठी वाहनाची व्यवस्था प्राधान्याने करणे तसेच मृत व्यक्ती आणि जनावरांना हलविण्याची व्यवस्था करणे. यासाठी एस.टी. महामंडळाच्या बसेस, शासकीय वाहने आणि खाजगी वाहनाचा वापर केला जाईल.
३. अतिसंवेदनशील भागात लाउडस्पीकर असलेल्या वाहनावरून दक्षतेचा इशारा देईल.
४. जनजीवन सुरळीतपणे सुरु होण्यासाठी दळणवळण व्यवस्था पूर्ववत करणे.
५. लोकांची सोडवणूक करून त्याचे स्थलांतर करावे तसेच तात्पुरत्या निवारा आणि अन्नधान्याची व्यवस्था करावी.
६. खाजगी वाहनाचे अधिग्रहण जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केले जाईल.
७. महसूल यंत्रणेमार्फत आरोग्य विभागाच्या मदतीने साथीचे रोग पसरणार नाहीत यासाठी उपाययोजना करावी.
८. अन्न, पाणी यांचे निरीक्षण करूनच त्याचे वितरण केले जाईल.
९. प्रतिसाद योजनेसाठी स्वयंसेवी संस्था आणि खाजगी व्यक्ती/ कंपनी यांच्याकडून मदतीचे आवाहन केले जाईल.
१०. कपडे, शिधा (सुके धान्य) यांचे वाटप करणे तसेच स्वयंपाकासाठी आवश्यक वस्तूंची उपलब्धता करणे.
११. सानुग्रह अनुदानाचे वाटप करणे.

Comments

Popular posts from this blog

आपत्ती व्यवस्थापन - शाळा | Disaster Management School | Apatti Vyavasthapan

प्राथमिक शाळेतील मुलं (विषेशत: ५- १२ वयोगटातील) आपत्तीच्या काळात दुर्बल असतात.अशा वेळी त्यांच्याकडे सर्वात अगोदर लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी शाळेचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून तो शासनाला व आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिला तर आपत्ती प्रसंगी मदत कार्य पोचण्यास मदत होईल. त्यासाठी त्यात खालील गोष्टींची नोंद असणे आवश्यक आहे. शाळेची प्राथमिक माहिती शाळेच्या प्राथमिक माहितीत शाळेचे पूर्ण नाव, पत्ता, मुख्याध्यापकाचे पूर्ण नाव, निवासचा पत्ता, संपर्क क्रमांक, शाळा संस्थापक व व्यवस्थापक संपर्क क्रमांक,एकूण कर्मचारी, वर्ग, ग्रंथालया, प्रयोगशाळा व इतर वापरांच्या खोल्यांची संख्या याची सविस्तर नोंद करणे आवश्यक आहे. शाळा आपत्ती व्यवस्थापन समिती शाळेतील कर्मचारी व पालक यांची शाळा आपत्ती व्यवस्थापन समिती गठीत करणे आवश्यक आहे. त्यांना शाळा आपत्ती व्यवस्थापना संबधी प्रशिक्षण व कौशल्य देणे आवश्यक आहे. या समितीच्या मदतीने शाळा आपत्ती व्यवस्थापन आराखडा करणे आवश्यक आहे. शक्य झाल्यास प्रत्येकी  २-३ समिती सदस्यांना जबाबदारी देऊन त्यात उपसमित्या गठीत कराव्यात. त्यात अग्निशामक समिती...

आग | Flame | | Disaster Management | Apatti Vyavasthapan

इंधन, प्राणवायू (ऑक्सीजन ) व उष्णता या तीन गोष्टीं एकत्र आल्याने आग निर्माण होते. या मध्ये एखादी गोष्ट नसली तरी आग निर्माण होऊ शकत नाही. आग लागणे ही एक प्रकारची आपत्तीच आहे. आग मानव निर्मित किंवा नैसर्गिक असू शकते. आगीची कारणे कोणती असू शकतात ? 1. वणवा ( झाडे व फांद्यांचे घर्षण होऊन निर्माण होणारी आग ), वीज पडणे या नैसर्गिक कारणाने आग लागते. 2. घरात निष्काळजीपणामुळे गॅस, स्टोहचा वापर/ वीजेचा शॉट सर्कीट यामुले देखील आगी लागतात. 3. पेट घेणारी रसायने,पेट्रोलियम पदार्थ, विजेच्या तारांची आयोग्य पद्धतीने मांडणी यामुळे आग लागते. 4. पेट घेणाऱ्या वस्तू अस्तव्यस्त पद्धतीने ठेवल्यास व त्यांचा आगीशी संबंध आल्यास आगी लागतात. 5. विडी.सिगारेट पिऊन / ओढून बेजबाबदारपणे जंगलात, रस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी टाकणे तसेच फटाक्यांचा अतिरिक्त व चुकीच्या पद्धतीने वापर यामुळे आगी लागतात. आगीचे परिणाम 1. मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. 2. जंगलात लागलेल्या आगीमुळे जैवविविधतेचे मोठे नुकसान होते. 3. जंगल व शेतीच्या परिसरात आग लागल्यामुळे चार, शेती अवजारे, जळाऊ इंधन ( सरपण,गोवऱ्या) यांचे नुक...

आपत्ती व्यवस्थापन - समुदाय | Disaster Management | Apatti Vyavasthapan

आपण वृत्तपत्रात नेहमी वाचतो. अतिवृष्टी झाली, पुर आला, विज पडली, भूकंप झाला त्यातून नुकसान झालं वगैरे. अलीकडे हवामान बदलामुळे विविध आपत्तींचा आपल्यास सामना करावा लागत आहे. त्यासाठी ग्रामस्तरावर समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन ( CBDM- Community Based Disaster Management ) तंत्र अवलंबित करण्याबाबद दोन शब्द. ... .... भूकंप, पूर, विज पडणे, वादळ, आग या आपत्ती येणे व त्यांची तीव्रता कमी करता येणे आपल्या हातात नसले तरी योग्य नियोजन केल्यास त्यांच्यापासून होणारे नुकसान कमी करता येणे शक्य आहे. गरज आहे ती फक्त आपल्या तयारीची. ... कुठेही निसर्ग किंवा मानव निर्मित आपत्ती उद्भवली की त्या क्षणी प्रथम दुर्बल होतो तो स्थानिक नागरिक ! तो बाहेरून येणा-या मदतीची प्रतिक्षा करण्याऐवजी थेट मदत कार्याला सुरुवात करतो. त्या वेळी कधी कधी त्याचे नुकसानही होते. म्हणून स्थानिक नागरिकांना आपत्कालीन मदत कार्याची माहिती देणे आवश्यक आहे. यासाठी समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन तंत्र स्वीकारायला हवं. समुदाय आपत्ती व्यवस्थापन म्हणजे थोडक्यात स्थानिक लोकांनी एकत्र येऊन केलेलं आपत्ती पूर्व नियोजन ! सविस्त...