Skip to main content

आपत्ती व्यवस्थापन घडयाळ. | Disaster Management Clock| Apatti Vyavasthapan

ऋतू निहाय प्रत्येक गाव व गटाची दिनचर्या, कामाचे स्वरूप वेगवेगळे असते. जसं महिला, पुरुष, वृद्ध, लहान मुले यांच्या झोपेतून उठण्याची वेळ वेगवेगळी असते. काही गावात महिला लवकर उठून आवरा-आवर करतात.शेतकरी महिलां बरोबरच उठून गायी- म्हैशीचं दुध काढतात. मुलं बहुदा उशिरा उठतात.या उलट नोकरदार कुटुंब असेल तर महिला लवकर उठतात. पुरुष व मुले उशिरा उठतात. या सगळ्या गोष्टी  एका विशिष्ट नमुन्यात भरल्या तर त्या गावाचं दिनचर्या घडयाळ तयार होईल व ठराविक वेळेत कोण काय काम करतं? कोण कुठं असतं?याची माहिती मिळेल. त्या माहितीच्या आधारे आपत्तीचं नियोजन करणं सोपं होईल.यामुळे दिनचर्या घड्याळास आपत्ती व्यवस्थापन घडयाळ असंही म्हणता येईल.

दिनचर्या घडयाळाचे उद्देश/ फायदे

१. आपत्तीच्या प्रंसंगी कोण कुठे आहे? हे बाहेरील लोकांना किंवा मदत करणाऱ्या व्यक्तींना कळवे. त्या प्रमाणे संकट ग्रस्तांना मदत करणं सोपं होईल.
२.आपत्ती प्रसंगी सर्वात अगोदर दुर्बल घटकांना मदत करणं सोपं होईल. उदा. लहान मुले, अपंग,वृध्द इत्यादी.
३.या दिनचर्या / आपत्ती व्यवस्थापन घड्याळाचा आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात वापर करून सरकारला सादर केलं तर मदत कार्य अधिक प्रभावी होईल.
४. विविध सामाजिक संस्था किंवा सरकार यांना तेथिल लोकांन सोबत त्यांच्या वेळेनुसार काम करता येईल.

कसं तयार कराल?

दिनचर्या घडयाळ तयार करताना लोकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असतो. म्हणुन त्यासाठी प्रत्येक गटातील प्रतिनिधी उपस्थित असणे आवश्यक आहे. उदा. शेतकरी, महिला, शाळेतील मुले, युवक, वृद्ध, नोकरदार.
१.सर्व प्रथम एक कार्डशीट पेपर घेऊन त्यात स्केज पेनच्या साह्याने गटानुसार गोल वर्तुळे काढा. ( चित्रात दाखवल्या प्रमाणे) वर्तुळ काढताना एक काळजी घ्या की त्यात लेखन करता येईल.
२.त्यानंतर अगदी आतल्या लहान वर्तुळात घड्याळाचे १ ते २४ पर्यंतचे आकडे लिहा.
३.मग गटनिहाय रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपे पर्यंतची दिनचर्या त्या त्या वर्तुळात लिहा.
४.संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून झाल्यांनतर त्याचे त्याच ठिकाणी वाचन करून त्यातील त्रुटी दुरुस्त करा.
५.तयार केलेले दिनचर्या घडयाळ रंगारीच्या ( पेंटर)मदतीने गावातील सावर्जनिक ठिकाणी व्यवस्थित काढा. ( कमीत कमी गावात ३-४ ठिकाणी काढा.)

दिनचर्या घडयाळ तयार करताना येणाऱ्या अडचणी व उपाय

१.बऱ्याचदा गटाची दिनचर्या सारखी नसल्याने दिनचर्या घडयाळ बनविताना अडचणी येतात. जसं प्रत्येक शेतकऱ्यांची दिनचर्या सारखी नसते. अशा वेळी त्या गटाची कॉमन दिनचर्या नोंद करावी.

Comments

Popular posts from this blog

आपत्ती व्यवस्थापन - शाळा | Disaster Management School | Apatti Vyavasthapan

प्राथमिक शाळेतील मुलं (विषेशत: ५- १२ वयोगटातील) आपत्तीच्या काळात दुर्बल असतात.अशा वेळी त्यांच्याकडे सर्वात अगोदर लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी शाळेचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून तो शासनाला व आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिला तर आपत्ती प्रसंगी मदत कार्य पोचण्यास मदत होईल. त्यासाठी त्यात खालील गोष्टींची नोंद असणे आवश्यक आहे. शाळेची प्राथमिक माहिती शाळेच्या प्राथमिक माहितीत शाळेचे पूर्ण नाव, पत्ता, मुख्याध्यापकाचे पूर्ण नाव, निवासचा पत्ता, संपर्क क्रमांक, शाळा संस्थापक व व्यवस्थापक संपर्क क्रमांक,एकूण कर्मचारी, वर्ग, ग्रंथालया, प्रयोगशाळा व इतर वापरांच्या खोल्यांची संख्या याची सविस्तर नोंद करणे आवश्यक आहे. शाळा आपत्ती व्यवस्थापन समिती शाळेतील कर्मचारी व पालक यांची शाळा आपत्ती व्यवस्थापन समिती गठीत करणे आवश्यक आहे. त्यांना शाळा आपत्ती व्यवस्थापना संबधी प्रशिक्षण व कौशल्य देणे आवश्यक आहे. या समितीच्या मदतीने शाळा आपत्ती व्यवस्थापन आराखडा करणे आवश्यक आहे. शक्य झाल्यास प्रत्येकी  २-३ समिती सदस्यांना जबाबदारी देऊन त्यात उपसमित्या गठीत कराव्यात. त्यात अग्निशामक समिती...

आग | Flame | | Disaster Management | Apatti Vyavasthapan

इंधन, प्राणवायू (ऑक्सीजन ) व उष्णता या तीन गोष्टीं एकत्र आल्याने आग निर्माण होते. या मध्ये एखादी गोष्ट नसली तरी आग निर्माण होऊ शकत नाही. आग लागणे ही एक प्रकारची आपत्तीच आहे. आग मानव निर्मित किंवा नैसर्गिक असू शकते. आगीची कारणे कोणती असू शकतात ? 1. वणवा ( झाडे व फांद्यांचे घर्षण होऊन निर्माण होणारी आग ), वीज पडणे या नैसर्गिक कारणाने आग लागते. 2. घरात निष्काळजीपणामुळे गॅस, स्टोहचा वापर/ वीजेचा शॉट सर्कीट यामुले देखील आगी लागतात. 3. पेट घेणारी रसायने,पेट्रोलियम पदार्थ, विजेच्या तारांची आयोग्य पद्धतीने मांडणी यामुळे आग लागते. 4. पेट घेणाऱ्या वस्तू अस्तव्यस्त पद्धतीने ठेवल्यास व त्यांचा आगीशी संबंध आल्यास आगी लागतात. 5. विडी.सिगारेट पिऊन / ओढून बेजबाबदारपणे जंगलात, रस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी टाकणे तसेच फटाक्यांचा अतिरिक्त व चुकीच्या पद्धतीने वापर यामुळे आगी लागतात. आगीचे परिणाम 1. मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. 2. जंगलात लागलेल्या आगीमुळे जैवविविधतेचे मोठे नुकसान होते. 3. जंगल व शेतीच्या परिसरात आग लागल्यामुळे चार, शेती अवजारे, जळाऊ इंधन ( सरपण,गोवऱ्या) यांचे नुक...

आपत्ती व्यवस्थापन - समुदाय | Disaster Management | Apatti Vyavasthapan

आपण वृत्तपत्रात नेहमी वाचतो. अतिवृष्टी झाली, पुर आला, विज पडली, भूकंप झाला त्यातून नुकसान झालं वगैरे. अलीकडे हवामान बदलामुळे विविध आपत्तींचा आपल्यास सामना करावा लागत आहे. त्यासाठी ग्रामस्तरावर समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन ( CBDM- Community Based Disaster Management ) तंत्र अवलंबित करण्याबाबद दोन शब्द. ... .... भूकंप, पूर, विज पडणे, वादळ, आग या आपत्ती येणे व त्यांची तीव्रता कमी करता येणे आपल्या हातात नसले तरी योग्य नियोजन केल्यास त्यांच्यापासून होणारे नुकसान कमी करता येणे शक्य आहे. गरज आहे ती फक्त आपल्या तयारीची. ... कुठेही निसर्ग किंवा मानव निर्मित आपत्ती उद्भवली की त्या क्षणी प्रथम दुर्बल होतो तो स्थानिक नागरिक ! तो बाहेरून येणा-या मदतीची प्रतिक्षा करण्याऐवजी थेट मदत कार्याला सुरुवात करतो. त्या वेळी कधी कधी त्याचे नुकसानही होते. म्हणून स्थानिक नागरिकांना आपत्कालीन मदत कार्याची माहिती देणे आवश्यक आहे. यासाठी समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन तंत्र स्वीकारायला हवं. समुदाय आपत्ती व्यवस्थापन म्हणजे थोडक्यात स्थानिक लोकांनी एकत्र येऊन केलेलं आपत्ती पूर्व नियोजन ! सविस्त...