Skip to main content

आपत्ती व्यवस्थापन - समुदाय | Disaster Management | Apatti Vyavasthapan

आपण वृत्तपत्रात नेहमी वाचतो. अतिवृष्टी झाली, पुर आला, विज पडली, भूकंप झाला त्यातून नुकसान झालं वगैरे. अलीकडे हवामान बदलामुळे विविध आपत्तींचा आपल्यास सामना करावा लागत आहे. त्यासाठी ग्रामस्तरावर समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन ( CBDM- Community Based Disaster Management ) तंत्र अवलंबित करण्याबाबद दोन शब्द. ... ....
भूकंप, पूर, विज पडणे, वादळ, आग या आपत्ती येणे व त्यांची तीव्रता कमी करता येणे आपल्या हातात नसले तरी योग्य नियोजन केल्यास त्यांच्यापासून होणारे नुकसान कमी करता येणे शक्य आहे.

गरज आहे ती फक्त आपल्या तयारीची. ...

कुठेही निसर्ग किंवा मानव निर्मित आपत्ती उद्भवली की त्या क्षणी प्रथम दुर्बल होतो तो स्थानिक नागरिक ! तो बाहेरून येणा-या मदतीची प्रतिक्षा करण्याऐवजी थेट मदत कार्याला सुरुवात करतो. त्या वेळी कधी कधी त्याचे नुकसानही होते. म्हणून स्थानिक नागरिकांना आपत्कालीन मदत कार्याची माहिती देणे आवश्यक आहे. यासाठी समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन तंत्र स्वीकारायला हवं. समुदाय आपत्ती व्यवस्थापन म्हणजे थोडक्यात स्थानिक लोकांनी एकत्र येऊन केलेलं आपत्ती पूर्व नियोजन !
सविस्तर विचार केल्यास आपत्ती व्यवस्थापन म्हणजे, आपत्तीच्या सुनियोजित प्रतिकारासाठी योग्य तयारी तात्काळ प्रतिसाद आणि आपत्तीनंतर उद्भवणारी परिस्थिति पुर्वपदावर आणण्याची योजना होय.
सरकार पण प्रत्येक वर्षी तालुका स्तरावर मा. तहशीलदार यांच्या अध्यक्षते खाली तालुका आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करते.पण ते संपूर्ण तालुक्याचा विचार करुन तयार करते .अशा वेळी सरकारला आपल्या गावाची गरज काय आहे ते समजत नाही. याउलट गावातील समुदायानी मिळून जर आपत्ती व्यवस्थापन आराखडा केला व तो सरकारला दिला तर आपली गरज काय आहे. हे सरकारला समजेल. त्यामुळे आपत्ती काळात आपल्याला आवश्यक ती मदत सरकार कडून मिळण्यास मदत होईल.

समुदाय आपत्ती व्यवस्थापन का ?

  • बाहेरील व्यक्ती पेक्षा स्थानिक लोकांना गावाची आधिक माहिती असते.
  • आपत्तीचा इतिहास व पूर्व अनुभव व त्यावेळी केलीली स्थानिक उपाय योजना याचे स्थानिकांना उत्तम ज्ञान.
  • गावातील उपलब्ध संसाधनांची चांगली माहिती.

समुदाय आपत्ती व्यवस्थापनाचे उद्देश

१. स्थानिक लोकांत आपत्तीशी सुनियोजित लढा देण्याची संस्कृती निर्माण करणे.
२. आपत्ती पूर्व नियोजन हा संस्कृतीचा एक भाग आहे. हे स्थानिकांच्या मनात बिंबवणे.
३. आपत्ती तयारीचा स्तर उंचावणे.
४. धोका व वाईट परस्थितीचे योग्य विश्लेषण करून आपत्ती प्रसंगातील जीवित व वित्त हानी कमीत कमी स्तरावर ठेवण्याचा प्रयत्न करणे.
५. उपलब्ध संसाधनांची जाणीव करुण देणे.
६. प्रशासन व गाव यात समन्वय साधून गाव प्रशासनास मजबूती प्राप्त करुण देणे.

समुदाय आपत्ती व्यवस्थापन आराखडयात करायच्या महत्त्वाच्या नोंदी

१. गावाची प्राथमिक माहिती/ पार्श्वभूमी
२. गावाचा आपत्तीचा इतिहास
३. आपत्तीचा कालानुक्रमे आलेख
४. गावातील संभाव्य धोके व उपाय योजना
५. गावातील संवेदनशील जागा/ गर्दीची ठिकाणे
६. गावाचा आपत्ती व्यवस्थापन नकाशा
७. आपत्ती प्रसंगी सुरक्षित जागा
८. गावातील लोकांची दिनचर्या
९. वार्षिक दिनदर्शिका
१०. खाद्य संस्कृती आराखडा
११. शाळेचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा
१२. आपत्कालीन महत्त्वाचे संपर्क क्रमांक

Comments

Popular posts from this blog

आपत्ती व्यवस्थापन - शाळा | Disaster Management School | Apatti Vyavasthapan

प्राथमिक शाळेतील मुलं (विषेशत: ५- १२ वयोगटातील) आपत्तीच्या काळात दुर्बल असतात.अशा वेळी त्यांच्याकडे सर्वात अगोदर लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी शाळेचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून तो शासनाला व आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिला तर आपत्ती प्रसंगी मदत कार्य पोचण्यास मदत होईल. त्यासाठी त्यात खालील गोष्टींची नोंद असणे आवश्यक आहे. शाळेची प्राथमिक माहिती शाळेच्या प्राथमिक माहितीत शाळेचे पूर्ण नाव, पत्ता, मुख्याध्यापकाचे पूर्ण नाव, निवासचा पत्ता, संपर्क क्रमांक, शाळा संस्थापक व व्यवस्थापक संपर्क क्रमांक,एकूण कर्मचारी, वर्ग, ग्रंथालया, प्रयोगशाळा व इतर वापरांच्या खोल्यांची संख्या याची सविस्तर नोंद करणे आवश्यक आहे. शाळा आपत्ती व्यवस्थापन समिती शाळेतील कर्मचारी व पालक यांची शाळा आपत्ती व्यवस्थापन समिती गठीत करणे आवश्यक आहे. त्यांना शाळा आपत्ती व्यवस्थापना संबधी प्रशिक्षण व कौशल्य देणे आवश्यक आहे. या समितीच्या मदतीने शाळा आपत्ती व्यवस्थापन आराखडा करणे आवश्यक आहे. शक्य झाल्यास प्रत्येकी  २-३ समिती सदस्यांना जबाबदारी देऊन त्यात उपसमित्या गठीत कराव्यात. त्यात अग्निशामक समिती...

आग | Flame | | Disaster Management | Apatti Vyavasthapan

इंधन, प्राणवायू (ऑक्सीजन ) व उष्णता या तीन गोष्टीं एकत्र आल्याने आग निर्माण होते. या मध्ये एखादी गोष्ट नसली तरी आग निर्माण होऊ शकत नाही. आग लागणे ही एक प्रकारची आपत्तीच आहे. आग मानव निर्मित किंवा नैसर्गिक असू शकते. आगीची कारणे कोणती असू शकतात ? 1. वणवा ( झाडे व फांद्यांचे घर्षण होऊन निर्माण होणारी आग ), वीज पडणे या नैसर्गिक कारणाने आग लागते. 2. घरात निष्काळजीपणामुळे गॅस, स्टोहचा वापर/ वीजेचा शॉट सर्कीट यामुले देखील आगी लागतात. 3. पेट घेणारी रसायने,पेट्रोलियम पदार्थ, विजेच्या तारांची आयोग्य पद्धतीने मांडणी यामुळे आग लागते. 4. पेट घेणाऱ्या वस्तू अस्तव्यस्त पद्धतीने ठेवल्यास व त्यांचा आगीशी संबंध आल्यास आगी लागतात. 5. विडी.सिगारेट पिऊन / ओढून बेजबाबदारपणे जंगलात, रस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी टाकणे तसेच फटाक्यांचा अतिरिक्त व चुकीच्या पद्धतीने वापर यामुळे आगी लागतात. आगीचे परिणाम 1. मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. 2. जंगलात लागलेल्या आगीमुळे जैवविविधतेचे मोठे नुकसान होते. 3. जंगल व शेतीच्या परिसरात आग लागल्यामुळे चार, शेती अवजारे, जळाऊ इंधन ( सरपण,गोवऱ्या) यांचे नुक...