Skip to main content

आपत्ती सुरक्षितता व सावधानता | Disaster Management | Apatti Vyavasthapan

अतिपाऊस, वादळ यामुळे उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीत बचावासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने तयारी ठेवली असून पावसाळ्यापूर्वीच पूर, वादळ, आग, भूकंप आदी नैसर्गिक आपत्तीवर मात करुन जीवित व वित्त हानी कशी टाळता येईल, याबाबत प्रशिक्षण देण्यात येवून प्रात्यक्षिकाद्वारे रंगीत तालीम घेण्यात आली. प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्यातरी आपत्तीतील विविध प्रकारची होणारी हानी कमी करण्यासाठी नागरिकांनीदेखील जागरूक राहणे गरजेचे आहे. पूरपरिस्थिती अथवा वादळ येण्यापूर्वी, आल्यानंतरच्या काळात नागरिकांनी घ्यावयाच्या काळजीबाबत थोडक्यात …
पूरापूर्वी घ्यावयाची काळजी :उंच खांबाची बैठक टाकून नद्या व समुद्र किनाऱ्यालगत इमारती उभाराव्यात.
  • पूर्वानुमानासाठी आकाशवाणी, दूरदर्शन वरील बातम्या ऐकत किंवा पाहत चला.
  • अधिकाऱ्यांकडून दिलेल्या सूचनेनुसार धोक्याची ठिकाणे खाली करा, सोडून द्या आणि अधिक सुरक्षित स्थानी, ठिकाणी स्थलांतर करा.
  • सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होत असताना कंदील, बॅटरी, खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी, कपडे व कागदपत्रं जवळ ठेवा.
  • कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीकडे ओळखपत्र राहिल असे पहा. शक्य झाल्यास घरातील सामान घरात उंचावर ठेवा.
  • गुरांना अधिक सुरक्षित ठिकाणी हलवा.

पूरपरिस्थितीत घ्यावयाची काळजी

  • सुरक्षित ठिकाणी राहून अचूक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करा.
  • सरकारी सुचनांचे पालन करुन सुरक्षित स्थळी स्थलांतरीत व्हा.
  • विद्युतप्रवाह बंद करा व उघड्या तारांना स्पर्श करु नका.
  • पोहता येत असल्यास बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवा.
  • अपरिचित किंवा खोल पाण्यात जाऊ नका.
  • पुरानंतरही नदीच्या पात्रात जाऊ नका. क्लोरीनयुक्त पाणी प्या.
  • उकळलेले पाणी प्या आणि सुरक्षित अन्नसेवन करा.
  • साठवलेल्या पाण्यात, डबक्यात किटकनाशके शिंपडा.
  • आपत्ती सर्व्हेक्षण गटाला अचूक माहिती पूरवून सहकार्य करा.
  • आपत्ती साधनसामुग्रीचे योग्य पद्धतीने, पद्धतशीरपणे वितरण करा. त्यासाठी स्थानिक मंडळ आणि स्वयंसेवक तयार करा.
  • धोकादायक आणि मोडकळलेल्या घरात प्रवेश करुन नका.

तुफान/वादळापूर्वी घ्यावयाची काळजी

  • रेडीओ (आकाशवाणीने), दूरदर्शनवरील बातम्या उद्घोषणा ऐकत चला.
  • मच्छिमारांनी समुद्रात प्रवेश करण्याचे साहस करु नये, आपले जहाज सुरक्षित ठिकाणी नांगरा.
  • मिठागरे तयार करणाऱ्या मजुरांनी सुरक्षितस्थानी स्थलांतर करा.
  • तुमच्या घराची दारे, खिडक्या मजबूत करा. गरजेच्या असणाऱ्या बॅटऱ्या, कंदील, खाद्यपदार्थ, पाणी, कपडे, आकाशवाणी इत्यादी वस्तू ताबडतोब वापरण्यासाठी तयार ठेवा.
  • मौल्यवान वस्तू प्लॅस्टिक पिशवीमध्ये बंद करा आणि त्यांना घरच्या वरच्या बाजूवर (माखणीवर) वगैरे ठेवा. आपली वाहने सुसज्ज ठेवा.
  • गरज भासल्यास आणखी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हा आणि प्राण्यांनादेखील सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करा.

वादळ, तुफान असल्यास

  • पाण्याच्या प्रवाहापासून दूर जा.
  • वृक्षांजवळ किंवा विजेच्या खांबांजवळ थांबू नका, वीज प्रवाह आणि गॅस प्रवाह बंद करा.
  • घरातून बाहेर पडू नका, घराची दारे आणि खिडक्या बंद करा.
  • नियंत्रण कक्षाकडून दूरध्वनीद्वारे अचूक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा, अफवांपासून दूर रहा.

तुफान, वादळानंतर

  • उद्घोषणेनंतरच बाहेर पडा.
  • अपरिचित जलप्रवाहातून ये-जा करु नका.
  • प्रथमोपचारानंतर जखमींना दवाखान्यात न्या, नंतर लगेचच अडकलेल्यांना वाचवा.
  • विद्युतप्रवाह जिच्यातून वाहत आहे किंवा जी तार तुटलेली आहे/उघडी पडलेली आहे तिला स्पर्श करु नका.
  • पडक्या इमारती जमीन दोस्त करा.
  • पिण्यासाठी क्लोरीनयुक्त पाणी वापरा, साठवलेल्या आणि घाण पाण्यात निर्जंतूक शिंपडा.
आपत्ती काळात वरील उपाययोजनांचा अवलंब केला तर होणारी जीवित व वित्त हानी आपणास काही प्रमाणात निश्चितच टाळता येईल.

Comments

Popular posts from this blog

आपत्ती व्यवस्थापन - शाळा | Disaster Management School | Apatti Vyavasthapan

प्राथमिक शाळेतील मुलं (विषेशत: ५- १२ वयोगटातील) आपत्तीच्या काळात दुर्बल असतात.अशा वेळी त्यांच्याकडे सर्वात अगोदर लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी शाळेचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून तो शासनाला व आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिला तर आपत्ती प्रसंगी मदत कार्य पोचण्यास मदत होईल. त्यासाठी त्यात खालील गोष्टींची नोंद असणे आवश्यक आहे. शाळेची प्राथमिक माहिती शाळेच्या प्राथमिक माहितीत शाळेचे पूर्ण नाव, पत्ता, मुख्याध्यापकाचे पूर्ण नाव, निवासचा पत्ता, संपर्क क्रमांक, शाळा संस्थापक व व्यवस्थापक संपर्क क्रमांक,एकूण कर्मचारी, वर्ग, ग्रंथालया, प्रयोगशाळा व इतर वापरांच्या खोल्यांची संख्या याची सविस्तर नोंद करणे आवश्यक आहे. शाळा आपत्ती व्यवस्थापन समिती शाळेतील कर्मचारी व पालक यांची शाळा आपत्ती व्यवस्थापन समिती गठीत करणे आवश्यक आहे. त्यांना शाळा आपत्ती व्यवस्थापना संबधी प्रशिक्षण व कौशल्य देणे आवश्यक आहे. या समितीच्या मदतीने शाळा आपत्ती व्यवस्थापन आराखडा करणे आवश्यक आहे. शक्य झाल्यास प्रत्येकी  २-३ समिती सदस्यांना जबाबदारी देऊन त्यात उपसमित्या गठीत कराव्यात. त्यात अग्निशामक समिती...

आग | Flame | | Disaster Management | Apatti Vyavasthapan

इंधन, प्राणवायू (ऑक्सीजन ) व उष्णता या तीन गोष्टीं एकत्र आल्याने आग निर्माण होते. या मध्ये एखादी गोष्ट नसली तरी आग निर्माण होऊ शकत नाही. आग लागणे ही एक प्रकारची आपत्तीच आहे. आग मानव निर्मित किंवा नैसर्गिक असू शकते. आगीची कारणे कोणती असू शकतात ? 1. वणवा ( झाडे व फांद्यांचे घर्षण होऊन निर्माण होणारी आग ), वीज पडणे या नैसर्गिक कारणाने आग लागते. 2. घरात निष्काळजीपणामुळे गॅस, स्टोहचा वापर/ वीजेचा शॉट सर्कीट यामुले देखील आगी लागतात. 3. पेट घेणारी रसायने,पेट्रोलियम पदार्थ, विजेच्या तारांची आयोग्य पद्धतीने मांडणी यामुळे आग लागते. 4. पेट घेणाऱ्या वस्तू अस्तव्यस्त पद्धतीने ठेवल्यास व त्यांचा आगीशी संबंध आल्यास आगी लागतात. 5. विडी.सिगारेट पिऊन / ओढून बेजबाबदारपणे जंगलात, रस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी टाकणे तसेच फटाक्यांचा अतिरिक्त व चुकीच्या पद्धतीने वापर यामुळे आगी लागतात. आगीचे परिणाम 1. मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. 2. जंगलात लागलेल्या आगीमुळे जैवविविधतेचे मोठे नुकसान होते. 3. जंगल व शेतीच्या परिसरात आग लागल्यामुळे चार, शेती अवजारे, जळाऊ इंधन ( सरपण,गोवऱ्या) यांचे नुक...

आपत्ती व्यवस्थापन - समुदाय | Disaster Management | Apatti Vyavasthapan

आपण वृत्तपत्रात नेहमी वाचतो. अतिवृष्टी झाली, पुर आला, विज पडली, भूकंप झाला त्यातून नुकसान झालं वगैरे. अलीकडे हवामान बदलामुळे विविध आपत्तींचा आपल्यास सामना करावा लागत आहे. त्यासाठी ग्रामस्तरावर समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन ( CBDM- Community Based Disaster Management ) तंत्र अवलंबित करण्याबाबद दोन शब्द. ... .... भूकंप, पूर, विज पडणे, वादळ, आग या आपत्ती येणे व त्यांची तीव्रता कमी करता येणे आपल्या हातात नसले तरी योग्य नियोजन केल्यास त्यांच्यापासून होणारे नुकसान कमी करता येणे शक्य आहे. गरज आहे ती फक्त आपल्या तयारीची. ... कुठेही निसर्ग किंवा मानव निर्मित आपत्ती उद्भवली की त्या क्षणी प्रथम दुर्बल होतो तो स्थानिक नागरिक ! तो बाहेरून येणा-या मदतीची प्रतिक्षा करण्याऐवजी थेट मदत कार्याला सुरुवात करतो. त्या वेळी कधी कधी त्याचे नुकसानही होते. म्हणून स्थानिक नागरिकांना आपत्कालीन मदत कार्याची माहिती देणे आवश्यक आहे. यासाठी समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन तंत्र स्वीकारायला हवं. समुदाय आपत्ती व्यवस्थापन म्हणजे थोडक्यात स्थानिक लोकांनी एकत्र येऊन केलेलं आपत्ती पूर्व नियोजन ! सविस्त...