Skip to main content

भूकंप | Earthquake | Disaster Management | Apatti Vyavasthapan

भूकवचाखाली असणाऱ्या द्रवरूपी पदार्थामुळे जमिनीस जे हादरे बसतात त्याला भूकंप म्हणतात. भूकंपामुळे जमिनीच्या पोटात असणारे विविध स्तर मागे – पुढे , खाली- वर सरकून जमिनीला भेगा पडल्यामुळे भूकंप होतो. भूगर्भाचा अभ्यास करणाऱ्या काही तज्ज्ञांच्या मते जगभरात दरवर्षी सुमारे ३० लाख भूकंप होतात. मात्र हे आपल्या सहजासहजी लक्षात येत नाही. कारण बऱ्याच ठिकाणच्या भूकंपाची तीव्रता कमी असते. निरिक्षणावरून असे लक्षात येते कि बहुसंख्य भूकंप हे समुद्रात होतात. भूकंपाचीनोंद करणाऱ्या यंत्रास सेस्मोग्राफ म्हटलं जातं. ही नोंद रिश्टर स्केल या गणिती एककात मोजतात. ही यंत्रे बऱ्याचदा मोठया- मोठया धरणांजवळ बसवलेली असतात. कारण अशा ठिकाणी जमिनीत पाणी मुरुन भूकंप होण्याची शक्यता असते. याठिकाणी भूकंप झालच तर जलाशय फुटून मोठे नुकसान होऊ शकते.

भूकंपाची कारणे

१.ज्वालामुखीच्या  उद्रेकामुळे भूकंप होतात.
2. मोठ –मोठया धरणाचा जमिनीवर पडणारा ताण, खाण काम, मोठया रस्त्याचा कामासाठी सुरुंग लावाणे, जमिनीच्या आत घेतल्या जाणाऱ्या अणुचाचण्या अशा मानवनिर्मित कारणांमुळे देखील भूकंप होतात.
3. पृथ्वीच्या पोटात प्रचंड उष्णता असल्याकारणाने त्यात असलेला तप्त लाव्हारस उफाळून वर येऊन भूकंप होतात.

भूकंपाचे परिणाम

1. भूकंपामुळे मनुष्यासह वन्यजीव व पाळीव प्राणी यांची जीवित हानी होते.
2. जमिनीला तडे गेल्यामुळे घरे, लहान-मोठया इमारती, रस्ते,शासकीय कार्यालये जमीन दोस्त होतात.त्यामुळे मोठया प्रमाणात वित्त हानी होते.
3. विजेचे खांब, वीजवाहक तारा, रस्ते,रेल्वे रूळ धरणे, गॅस व जल वाहिन्या यांचे मोठया प्रमाणात नुकसान होऊन पुन्हा नवी आपत्ती ओढवण्याची शक्यता असते.
४. जैवविविधतेचे नुकसान होऊन परीसंस्था धोक्यात येते.
५. भूकंपामुळे बऱ्याचदा नदया, नाले आपले प्रवाह बदलतात.
६. मनुष्य व प्राण्यांची जीवितहानी झाल्यामुळे परिसरात दृगंधी पसरून रोगराई निर्माण होते.

भूकंप काळात घ्यावायची दक्षता

  • घरातून बाहेर पडण्यापूर्वी
१.जाणीव होताच शक्य होईल तितक्या लवकर मोकळ्या मैदानात जाण्याचा प्रयत्न करावा.
२. घरातील वृद्ध,अपंग,लहान मुले यांना मोकळ्या मैदानात नेण्याचा प्रयत्न करा.
३. घरातील विजेची उपकरणे बंद करून ठेवावीत.
४. घरातील स्टोव्ह, गॅस बंद करा.
५. घरातून बाहेर पडताना डोक्यावर जाड कापड उदा. ब्लंकेट अथवा गोधडीची  घडी, उशी ठेऊन सुरक्षित बाहेर पडा.
६. सोबत पिण्याचे पाणी, खाण्याचे थोडेफार साहित्य ठेवा.
  • घरातून बाहेर पडल्यानंतर
१. मोकळ्या जागेत उभे राहा.
२. आसपास उंच झाडे ,इमारती,विजेच्या तारा व खांब नाहीत याची खात्री करा.
३. डोंगराळ किंवा उंच परिसर असेल तर घरंगळत येणाऱ्या दगडांपासून सावध राहा.
४. थोडं स्थिर झाल्यावर आपल्या घरातील, शेजारी, लहान मुले, वृद्ध, अपंग सुरक्षित आहेत का? याची खात्री करा.
  • भूकंपानंतर
१. लहान मुले, वयोवृद्ध व अपंग व्यक्तींकडे विशेष लक्ष द्यावे.
२. मृत व्यक्तींना ओळखण्यास मदत करा व त्यांच्या कुटुंबीयांना शक्य होईल ती मदत करा.
३. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न करा.
४. भुकंपा दरम्यान काही इजा झाली असेल तर त्वरित उपचार घ्या.
५. तात्पुरत्या स्वरुपात आपली एखादया घरात राहण्याची व्यवस्था केली असेल तर घराला कुठलाही धोका नाही ना ? याची खात्री करा.

Comments

Popular posts from this blog

आपत्ती व्यवस्थापन - शाळा | Disaster Management School | Apatti Vyavasthapan

प्राथमिक शाळेतील मुलं (विषेशत: ५- १२ वयोगटातील) आपत्तीच्या काळात दुर्बल असतात.अशा वेळी त्यांच्याकडे सर्वात अगोदर लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी शाळेचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून तो शासनाला व आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिला तर आपत्ती प्रसंगी मदत कार्य पोचण्यास मदत होईल. त्यासाठी त्यात खालील गोष्टींची नोंद असणे आवश्यक आहे. शाळेची प्राथमिक माहिती शाळेच्या प्राथमिक माहितीत शाळेचे पूर्ण नाव, पत्ता, मुख्याध्यापकाचे पूर्ण नाव, निवासचा पत्ता, संपर्क क्रमांक, शाळा संस्थापक व व्यवस्थापक संपर्क क्रमांक,एकूण कर्मचारी, वर्ग, ग्रंथालया, प्रयोगशाळा व इतर वापरांच्या खोल्यांची संख्या याची सविस्तर नोंद करणे आवश्यक आहे. शाळा आपत्ती व्यवस्थापन समिती शाळेतील कर्मचारी व पालक यांची शाळा आपत्ती व्यवस्थापन समिती गठीत करणे आवश्यक आहे. त्यांना शाळा आपत्ती व्यवस्थापना संबधी प्रशिक्षण व कौशल्य देणे आवश्यक आहे. या समितीच्या मदतीने शाळा आपत्ती व्यवस्थापन आराखडा करणे आवश्यक आहे. शक्य झाल्यास प्रत्येकी  २-३ समिती सदस्यांना जबाबदारी देऊन त्यात उपसमित्या गठीत कराव्यात. त्यात अग्निशामक समिती...

आग | Flame | | Disaster Management | Apatti Vyavasthapan

इंधन, प्राणवायू (ऑक्सीजन ) व उष्णता या तीन गोष्टीं एकत्र आल्याने आग निर्माण होते. या मध्ये एखादी गोष्ट नसली तरी आग निर्माण होऊ शकत नाही. आग लागणे ही एक प्रकारची आपत्तीच आहे. आग मानव निर्मित किंवा नैसर्गिक असू शकते. आगीची कारणे कोणती असू शकतात ? 1. वणवा ( झाडे व फांद्यांचे घर्षण होऊन निर्माण होणारी आग ), वीज पडणे या नैसर्गिक कारणाने आग लागते. 2. घरात निष्काळजीपणामुळे गॅस, स्टोहचा वापर/ वीजेचा शॉट सर्कीट यामुले देखील आगी लागतात. 3. पेट घेणारी रसायने,पेट्रोलियम पदार्थ, विजेच्या तारांची आयोग्य पद्धतीने मांडणी यामुळे आग लागते. 4. पेट घेणाऱ्या वस्तू अस्तव्यस्त पद्धतीने ठेवल्यास व त्यांचा आगीशी संबंध आल्यास आगी लागतात. 5. विडी.सिगारेट पिऊन / ओढून बेजबाबदारपणे जंगलात, रस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी टाकणे तसेच फटाक्यांचा अतिरिक्त व चुकीच्या पद्धतीने वापर यामुळे आगी लागतात. आगीचे परिणाम 1. मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. 2. जंगलात लागलेल्या आगीमुळे जैवविविधतेचे मोठे नुकसान होते. 3. जंगल व शेतीच्या परिसरात आग लागल्यामुळे चार, शेती अवजारे, जळाऊ इंधन ( सरपण,गोवऱ्या) यांचे नुक...

आपत्ती व्यवस्थापन - समुदाय | Disaster Management | Apatti Vyavasthapan

आपण वृत्तपत्रात नेहमी वाचतो. अतिवृष्टी झाली, पुर आला, विज पडली, भूकंप झाला त्यातून नुकसान झालं वगैरे. अलीकडे हवामान बदलामुळे विविध आपत्तींचा आपल्यास सामना करावा लागत आहे. त्यासाठी ग्रामस्तरावर समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन ( CBDM- Community Based Disaster Management ) तंत्र अवलंबित करण्याबाबद दोन शब्द. ... .... भूकंप, पूर, विज पडणे, वादळ, आग या आपत्ती येणे व त्यांची तीव्रता कमी करता येणे आपल्या हातात नसले तरी योग्य नियोजन केल्यास त्यांच्यापासून होणारे नुकसान कमी करता येणे शक्य आहे. गरज आहे ती फक्त आपल्या तयारीची. ... कुठेही निसर्ग किंवा मानव निर्मित आपत्ती उद्भवली की त्या क्षणी प्रथम दुर्बल होतो तो स्थानिक नागरिक ! तो बाहेरून येणा-या मदतीची प्रतिक्षा करण्याऐवजी थेट मदत कार्याला सुरुवात करतो. त्या वेळी कधी कधी त्याचे नुकसानही होते. म्हणून स्थानिक नागरिकांना आपत्कालीन मदत कार्याची माहिती देणे आवश्यक आहे. यासाठी समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन तंत्र स्वीकारायला हवं. समुदाय आपत्ती व्यवस्थापन म्हणजे थोडक्यात स्थानिक लोकांनी एकत्र येऊन केलेलं आपत्ती पूर्व नियोजन ! सविस्त...